Monday, December 2, 2019

वावटळ ६


वावटळ ६

मुंबईत काय करायचे हो
ट्राफिक पोलीस?
हात दाखवून अवलक्षण?
मनमानी आता वाहनवाल्यांची,
तशीच ती पादचाऱ्यांची.
आपुल्या सोयीने कोणीही
हात दाखवून थांबवीत वाहने
प्रवहाच्या विरुद्ध कसे हि कोठेही
चालती वाहने, दुचाकी वर बसती चार चार
शिटी वाजुवूनी थकती हवालदार ,
कंटाळुनी सोडूनी देती,दमूनी 
पकडा पकडीचा खेळून खेळ 
करती काणाडोळा म्हणती मनात
मरा लेकांनो नशीब तुमचे,
गरज काय आता त्या खाबांची 
लाल हिरव्या नारंगी दिव्यांची?
मुंबई कोणाची ?
ना तुझी, ना माझी,
ना भैयाची, ना भागवानची,
ना मियांची ना बेगमची,
ना आंटीची ना अंकलची
ना पार्श्यांची ना गुजरात्याची
ना मद्राष्याची, ना कानडयाची,
मग मुंबई कोणाची? कोणाची?
महाराष्ट्राची? मराठ्याची ?छे!छे!
बळकावली तीस अंबानी अडानीने,
बसली पाहत मराठी जनता
आ वासोनी होऊनी, त्यांची दास.
भंगले  स्वप्न मराठी जनतेचे,
भारताचे, आता अंबानी, अडानी
झाले माई,बाप.

  







No comments:

Post a Comment

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...