Monday, June 8, 2026

खण पुन्हा उघडताना



 


खण पुन्हा उघडताना

अरे बापरे!

१५० हून अधिक पाने... आणि अनुक्रमणिकाही नाही?

अशी प्रतिक्रिया काही वाचकांच्या मनात येणे अगदी स्वाभाविक आहे.

पण मग आठवले — पुस्तकाचे नावच "खचखोळ" आहे.

खचखोळ म्हणजे काय?

आपल्या टेबलाच्या खणात डोकावून पाहा. तिथे खोडरबर असेल, पेन्सिलीची थोटके असतील, एखादे मोरपीस, जुनी राखी, शुभेच्छापत्रे, चिट्ठ्या-चिटोरे, सुकलेले फूल, मोडका चष्मा, व्हिजिटिंग कार्ड्स, काडेपेटी, गोट्या...

या वस्तूंचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो.

तरीही आपण त्या जपून ठेवतो.

कारण वस्तूंपेक्षा त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी, अनुभव आणि क्षण अधिक महत्त्वाचे असतात.

"खचखोळ" हे पुस्तक आणि हा ब्लॉग काहीसा तसाच आहे.

इथे राजकारण आहे, समाज आहे, माणसे आहेत, प्रवास आहे, आठवणी आहेत, निरीक्षणे आहेत, प्रश्न आहेत, काही ठाम मते आहेत आणि काही न सुटलेली कोडीही आहेत.

त्यांची शिस्तबद्ध रांग नाही.अनुक्रमणिका नाही.आणि असली तरी तिचा फारसा उपयोग झाला नसता.

कारण मनुष्याचा मेंदू अनुक्रमणिकेनुसार विचार करत नाही.

तो एका क्षणी बालपणात भटकतो, दुसऱ्या क्षणी वर्तमानपत्राच्या मथळ्यात शिरतो, तिसऱ्या क्षणी एखाद्या कवितेच्या ओळीत विसावतो आणि चौथ्या क्षणी विस्मृतीत गेलेल्या आठवणीचा धागा पकडतो.

"खचखोळ" हा त्या भटक्या मनाचा लेखी मागोवा आहे.

हे पुस्तक बऱ्याच काळापासून माझ्या सोबतीने प्रवास करत आहे.

त्यातील अनेक लेख, नोंदी आणि विचार आता पुस्तकाच्या रूपात एकत्र आले आहेत. प्रकाशनाची वाट मात्र अजून सुरू आहे. प्रत्येक पुस्तकाचा स्वतःचा प्रवास असतो. काही पुस्तके सरळ रस्त्याने वाचकांपर्यंत पोहोचतात; काहींना थोडी अधिक वळणे घ्यावी लागतात.

"खचखोळ" बहुधा दुसऱ्या प्रकारात मोडतो.तोवर विचार केला,खण बंदच का ठेवायचा? म्हणून हा ब्लॉग पुन्हा उघडत आहे.

गेल्या वर्षभरात येथे शांतता होती. पण शांतता म्हणजे रिकामेपणा नव्हे. मनाच्या खणात नवे विचार, नवी निरीक्षणे आणि काही जुने प्रश्न जमा होतच होते.

आता  खण पुन्हा उघडत आहे.

कुठलेही पान उघडा. आजचे वाचा किंवा कालचे.

आवडले तर पुढे जा. नाही आवडले तर दुसऱ्या खणात डोकावा.

कदाचित एखादी आठवण. कदाचित एखादा प्रश्न.



कदाचित स्वतःचाच एखादा विसरलेला भाग.

बाकी निर्णय तुमचा.

खण उघडा आहे.

पुस्तक अजून वाटेवर आहे.

— अरुण काळे

जून २०२६







Monday, August 25, 2025

तू आहेस!!!!

 


तू आहेस !!!!

तू आहेस तरी कोण?

थोड्यावेळासाठी समजा, मी तुझे अस्तित्व विसरलो,

मग हे विश्वास न बसणारे चमत्कार कोण करतो?

उत्तराची सुई तुझ्या दिशेनेच फिरते.

परवा झालेल्या अहमदाबाद विमान अपघातात

२३०पैकी २२९ मृत होतात आणि एक प्रवासी एवढ्या मोठ्या

अपघातून सहीसलामत वाचतो, नाही तू वाचवतोस? का?

माझ्या बुद्धीस हा तुझा चमत्कारच!!!

काही तरी कारण, जे केवळ तू जाणतोस.


२३० प्रवाशांमधून एक जीव वाचवलास.

चक्रावलेला मेंदू, डोळे मिटून,

हात जोडून स्वगत पुटपुटतो.

विश्वास ठेव, किंवा न ठेवूही शकतोस,

तू आहेस!!!!



Friday, August 22, 2025

"ना भूतो ना भविष्यती "




"गेले वर्ष भर मी माझ्या ब्लॉग्स चे पुस्तकात रूपांतर करण्यास झटत आहे. होय खऱ्या अर्थाने.वयोपरत्वे शुद्ध लेखन तपासणे माझ्या साठी एक भयानक स्वप्न झाले आहे. 

असो.आज वर्षाने ब्लॉग लिहिण्याचा योग आला तो देखीलआला नसता जर 

'अगा जे घडलेच नाही' असा प्रकार झाला नसता. नक्की माहित नाही पण असा प्रकार देशात प्रथमच झाला असावा.

पहिली ५ वर्षे फुशारक्या मारणाऱ्या,उत्तम डिझायनर कपडे दिवसातून ३ वेळा बदलणाऱ्या, येणाऱ्या जाणाऱ्या परराष्ट्र प्रमुखांना मिठ्ठया मारणाऱ्या,काळा पैसा १ वर्षातआणण्याचे वचन देणाऱ्या, अचानक नोट बंदी करणाऱ्या, करोना सारख्या विश्व व्यापी आजारावर उपाय म्हणून जनतेस थाळ्या वाजवयास लावणाऱ्या,कर्ज काढून बँकांचे दिवाळे वाजवणाऱ्याना 'चल उड जा रे पंछी' म्हणत काणा डोळा करणाऱ्या, 'निरोध' सारख्या जनसंख्येस आळा घालणाऱ्या वस्तू वर देखील GST लावणाऱ्या, जातीय वाद भडकवणाऱ्या, शेतकऱ्याना न जुमानणाऱ्या, मणिपूर मधील आग डोंबाकडे "अगा जे घडलेच नाही"दृष्टिकोन असणाऱ्या,पृथ्वी भ्रमण १० वा ग्रह बनून सतत फिरणाऱ्या, देशाचे करोडो उडवणाऱ्या, गादीचा मोह न सुटणाऱ्या, विरोधी पक्षाची गाऱ्हाणी न जुमानणाऱ्या, "हम करे सो कायदा" वर्तणूक असणाऱ्या सुरुवातीचे खोटे मुखवटे फाटल्यावर लोकप्रियतेला ठिगळे लावून फिरणाऱ्या, हरता हरता कुबड्या शोधून उभा राहणाऱ्या,आपल्याच मित्राना देश विकणाऱ्या, आवश्यक लढाया बलवान देशाच्या सांगण्यावर बंद करणाऱ्या, व जशी विरोधकांच्या आगीची झळ लागल्यावर पळ काढणाऱ्या,  आपल्या हाताशी सर्व पाळीव मंत्री मिरवणाऱ्या, अरे हो स्वतःचे सेल्फी दुसऱ्या कडून काढून घेण्याचा नाद असणाऱ्या, तडीपार माणसास आपला उजवा हाथ बनवून गृहखाते सोपविणाऱ्या ह्या देश रखवाल्याचे २१  ऑगस्ट २०२५ ला संसदेत प्रवेशाचे स्वागत  विरोधकांनी नाऱ्याने केले.

नारे होते "वोट चोर गद्दी छोड" "वोट चोर गद्दी छोड". ह्या हुन अधिक लोकशाहीत होणारा अपमान भारताच्या ७६ व्या स्वतंत्र वर्षां मध्ये "ना भूतो ना भविष्यती " होणे नाही पण त्याच बरोबर "निर्लजम सदा सुखी हे जनतेस विसरून चालणार नाही.

आपले राष्ट्रीय ब्रीद वाक्य 'सत्यमेव जयते' बदलण्याची वेळ न येवो हि प्रार्थना.

Tuesday, September 10, 2024

चाफा आणि सोनटक्क्याचेअबोल प्रेम

 मी पाहिलंय ते अबोल प्रेम, 

 


ते देखील दुतर्फी,

विचार करा १ नाही तर ५ वर्षे 

त्याचे रोज तिच्या बाकावर 

नियमितपणे ती यावयाच्या पूर्वीच 

हळुवार हाताने पिवळा चाफा ठेवणे, 

पाहिलंय मी. 

तिला पण पाहिली,

चहूकडे नजर टाकीत स्मित करीत 

चाफा वेणीत माळताना, 

तो देखील सर्वांच्या नजरा 

सम्भाळत तिने बाकावर ठेवलेला

सोनटक्का मुठीत घेऊन वास घेताना

पाहिलंय मी, त्याला 

दोघांच्या नजरेतील अबोल प्रेम 

ओसंडताना पाहिलंय मी.

५ वर्षे ५ दिवसासारखी सरकली.

शेवटच्या दिवशीची त्यांची मानसिक 

ओढाताण पाहवेना मला. 

आज चाफा नाही माळला 

त्याने देखील सोनटक्का नाही शोधला,

कॉलेज गेट मधून बाहेर पडताना 

मान मोडेस्तोवर एकमेकाकडे 

वळून,वळून पहात, करुण नजरेने  

वेगवेगळ्या वाटेने निघून जाताना,

अबोल प्रेमाचा शेवट झाला.


मनात एकच प्रार्थना 

घेऊन मी हि वळलो माझ्या  वाटेवर 

कधीतरी चाफा आणि सोनटक्क्यास 

प्रेमाचे बोल, सूर सापडतील 

हे प्रेमही  बोलके होईल.

 

 




  



Sunday, September 8, 2024

पितृछत्र

ऐन तारुण्यात पितृछत्र हरवले,

पितृछत्र म्हणजे काय
याची जाणीव झाली.
रोज दिसणारी व्यक्ती अचानक
कायमच्या सुट्टीवर जाते,
हाक मारणारा आवाज
ऐकूच येत नाही आशीर्वादाचा हात
डोक्यावरून फिरत नाही
गाऱ्हाणे ऐकणारे कान बहिरे होतात
अशाप्रसंगी...हृदयात जपलेल्या
पितृ प्रतिमेशी स्वगत करून
आयुष्याचे गाडे ढकलावे लागते.
आज बघता बघता...
57 वर्षे उलटली.

Monday, September 2, 2024

नारळ का नाही पडला????




आला, आला आला वारा! 

सोसाट्याचा वारा !!


ताड नाही पडला 

माड नाही पडला 

 नारळ नाही हल्ला...अरेरे  

छत्रपतींचा 35  फुटांचा पुतळा 

मात्र पाडून  गेला, 

सुरु झाला कल्ला, 

कसा पडला!  पडला कसा!

कोण म्हणे वारा कोण म्हणे पाऊस

जनतेस प्रश्न पडला??? 

नारळ का नाही पडला????


आले मंत्री आले संत्री 

बोटे एकमेकाकडे  दाखवू लागले, 

बनवला कोणी? कोणी? कोणी?

तो कुणाचा कोण? चर्चेला आले उधाण,

याचा मित्र, त्याचा भाऊ, त्याचा नातू, 

या गोंधळात, 

शिल्पकार फरार, शोधू कोठे?

नौदल, पोलीस चक्रावले,

महाराजांसमोर गुढघे टेकून, 

खालच्या मानेने हा मंत्री, तो मंत्री, माफी स्तर सुरु झाले,

झालेला गोंगाट दिल्लीत पोहचला 

जनतेचा कैवार मिळवण्यास, धावत आले पंतप्रधान,

महाराजांची लोटांगणा सहित माफी मागितली एक डोळ्याने, 

दुसरा डोळा इलेक्शन  वर ठेवून. 

महाराजांच्या कमजोर पुतळ्या प्रमाणे 

तीन पायाचे सरकार पडेल कि काय?

याचे भय वाढू लागले,  

तीन दिशेला तिघे गेले, 

विरोधकांवर आरोपाच्या फैरी झाडू लागले,

विरोधकांना कारण मिळाले,

जोडा मारो आंदोलन छेडले,

सुज्ञ जनता समजावयाचे ते समजून गेली,


रोज मरे त्याला कोण रडे?


जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा

 


 



 



  

 

 






 

Monday, August 26, 2024

उज्वल भविष्य



उज्वल भविष्य बेरोजगारी वर जालीम उपाय! कुठल्याही प्रकारचे  साईड  इफेक्ट्स नाहीत 

हा उपाय आता भारतात उपलब्ध!! आपल्या महाराष्ट्राच्या मुख्याना देशाच्या मुख्याने दिलेला कानमंत्र !!!!

बेरोजगारी नाहीशी करणार युवा रक्त आता परदेशाचे गाजर खाणार आपल्या देशाला जर्मन भाषेत राम राम ठोकणार 

लग्न संसार आता जर्मनीत. तुम्ही कुठल्याही व्यवसायात असा तुम्हाला महाराष्ट्र सरकार स्वखर्चाने शिक्षण व नोकरी देणार 

आता तुम्ही जर्मन होणार. आपल्या राष्ट्राची बेरोजगारी हटवणार.

तरुणांनो विचार करा पक्का. मायबोली,संतवाणी,महापुरुष आता जर्मन होणार, 

तुमच्या ललाटावर मोठे भाग्य महाराष्ट्राचे मुख्य व दोन उप लिहिणार.


त्या बदलय्यात जाता जाता  मत पेटित  गुरु दक्षिणा टाकण्यास विसरू नका. कधी मध्ये आठवण झाली तर येत जा.

 

खण पुन्हा उघडताना

  खण पुन्हा उघडताना अरे बापरे! १५० हून अधिक पाने... आणि अनुक्रमणिकाही नाही? अशी प्रतिक्रिया काही वाचकांच्या मनात येणे अगदी स्वाभाविक आहे. पण...