बघता बघता...
बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले.
दिवस छोटे झाले...
रात्र मोठी झाली...
पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांत मी एक शब्दही लिहिला नाही.
नेमकं कशात व्यस्त होतो, तेही आता आठवत नाही.
असं काही केलं, ज्याची नोंद मनात राहावी, असंही आठवत नाही.
वेळ मात्र न बोलता पुढे निघून गेली...
कधी कधी आपण दिवस जगतो...
कधी कधी दिवस आपल्याला जगतात.
लोक म्हणतात, आपल्या तळहातावरच्या
रेषांमध्ये आपले भविष्य लिहिलेले असते.
एक गंमत आहे.
जगात दोन माणसांच्या बोटांचे ठसे सारखे नसतात.
तसेच दोन माणसांच्या हस्तरेषाही सारख्या नसतात.म्हणजेच प्रत्येकाची वाट वेगळी...
प्रवास वेगळा... प्राक्तन ही वेगळ.
प्रत्येकाचा मार्ग वेगळा.
प्रत्येकाचा वेग वेगळा.
मग इतरांशी तुलना कशाकरिता?
काही दिवस लिहिले नाही.
काही दिवस काहीच घडले
नाही असे वाटते.
माझे शब्दही तसेच...
कुठेतरी शांतपणे रुजत असतील.
ऋतू बदलण्याची...
एका योग्य क्षणाची वाट पाहत.
वेळ आली की ते पुन्हा उमलतील.
तोपर्यंत...
एक गोष्ट मात्र, पक्की.
घड्याळ
चोवीस तासच दाखवत राहील.
अरुण काळे
जुलै २०२६