Tuesday, July 9, 2019

अजब न्याय = सत्य कथा






























एका उच्चभ्रू बाईने तीन नवरे केले, पहिला सोडला बिन पैशाचा म्हणून.
पण झाली दोन अपत्ये त्याच्या पासून.  मुले ठेवली आई कडे, केले दुसऱ्याला जवळ,  लग्न करून भागवायला हवस. जसा आला कंटाळा दिली सोड चिट्ठी अन गाठला तिसरा. 
गडगंज श्रीमंत १ मुलाचा बाप. राहू लागली बिन लग्नाची राणी म्हणून त्याच्या बरोबर. 
पहिल्या नवऱ्या पासून  झालेल्या मुलीस घ्यावयास लावले तिसऱ्यास दत्तक
त्याचा पैसा मुलीच्या नावे होईल ह्या दूरदर्शी विचाराने.मुलगी राहू लागली आई बरोबर. 
पण जगासमोर आईने जवळ केले मुलीला बहीण ह्या नात्याने, येथे बाई फसली,
सावत्र मुलगा पडला प्रेमात बाईच्या बहिणीच्या(मुलीच्या),बाईला भीती वाटली बिंग फुटण्याची,
तरुण प्रेमाने वेग घेतला तशी बाई थरथरली हातातून तेल तूप धुपाटणे सर्व जातंय पाहून डाव रचला अन काढला की हो काटा बहिणीचा (पोटच्या मुलीचा) घटस्फोटीत नवऱ्याच्या मदतीने.
घटस्फोटीत नवरा, वाहन चालक, झाले भागीदार रक्ताने हात माखले तिघांचे.
आले जाळून पुरून जंगलात. काढली सर्वांनी दोन वर्षे खून पचवील्याच्या  आंनदात.
झाले एक दिवस खुनाला वाचा फुटली.वाहन चालक सापडला तिसऱ्याच कारणाने कायद्याच्या कचाट्यात. पोलिसी खाक्या भोगल्यावर  माफीचा साक्षीदार बनून आधीचे गुन्हे,व मालकिणीचे काळे कृत्य तपशीलवार  भडाभडा ओकला.ऐश्वर्यात लोळणाऱ्या आईला मृत मुलीने तुरुंगाची फरशी दाखवली फाशीचा फंदा  आईच्या डोळ्यासमोर झुलवीत.

४दिवसा पूर्वी झळकलेली बातमी.

वरील बाई आता माफीचा साक्षीदार होणार!
आहे की नाही कायद्याने दिलेला एक अद्भूत अजब  न्याय.
(कारण पूर्व अर्थमंत्री आणि त्यांचे सुपुत्र ह्यांचे पाय एका अर्थ्व्यव्हारात तिच्या बरोबर बांधलेत,
शक्यता पूर्व अर्थमंत्री देखील तिच्या बरोबर तुरुंगवासभोगू शकतील.)

Saturday, June 29, 2019

पाऊस



आला आला  आला,

उन्हाळ्याला आंघोळ घालीत
धरतीला सुगंधी मिठीत घेत,
झाडांना, हिरवे लाजवत,
कौलांवर टप टप टप आवाज करीत ,
कडाड,कड,कडाड करीत, 
वीजेरी घेऊन काळ्या ढगांना उजाळत ,
दुष्काळाचे  सावट ओले करीत 
राज्यभर पसरला,
बळीराजाना  आनंदवले,
पेरणीच्या तयारीला लावले
चातकाची तहान भागवत, 
ढगांच्या तालावर, मोरांना नाचवत,
श्रावणाच्या कोवळ्या उन्हात बागडून,
सणवार सुरु करीत,
आला पाऊस आला!!

Wednesday, June 12, 2019

अळणी सत्य


tv वरील जाहिराती बघणे हा माझा छंद,
... परवा शुद्ध मीठाची जाहिरात लागली ती अशी
एक बाई सुपर मार्केटच्या पैसे देण्याच्या ठिकाणी
विकत घेतलेल्या जिनसा पट्यावर  ठेवत असते
counterवरील बाई वस्तू न्याहाळत असते,
जसे मिठाचे pack येते त्यावर...

सेल्सवूमन: हे काय बाकी सर्व वस्तू शुद्ध घेतल्यात
आणि मीठ मात्र साधे?
गृहिणी: म्हणजे? 
सेल्सवूमन: मिठही शुद्ध घ्या हे पहा अमुक...मीठ
यात जरा देखील रसायने नाहीत ...
जाहिरात पहिली मात्र आणि मनात गणित मांडले,

अशुद्ध रसायनवाले मीठ १ किलो घेतल्यास
त्यात रसायनाचे प्रमाण ‘क्ष’असेल समजा,
१ किलो= १००० ग्राम  मीठ ४ जणांच्या कुटुंबास अंदाजे
३० दिवस चालले तर एका माणसास एका दिवसाला  ८. ३४ ग्राम 
 मीठ दिवसास वापरात येते
जर १००० ग्रा.मध्ये क्ष% रसायन तर ८.३४ ग्रा. मध्ये किती? अंदाजे
०.००८३४ एवढे सुक्ष्म रसायन प्रत्येकी पोटात जाईल
ह्या सुक्ष्म प्रमाणात रसायन पोटात गेल्यास मनुष्यास
किती त्रास किती दिवसाने/ वर्षाने होईल हे आपण ठरवायचे.
शुद्ध आणि अशुद्ध मीठाच्या किमतीत असलेली तफावत
कमीत कमी १०% नक्कीच,ह्यास तुम्हीच तुमच्या 
पुढील महीन्याच्या खर्चात मिळवा म्हणजेच 
महिन्याच्या किराणा खर्चातकिती वाढ होईल ह्याचा हिशोब करा,
मग लक्षात येईल की हि केवळ जाहिरातबाजीने
भीती घालून केलेली लूटमार आहेहे सुज्ञास सांगणे न लगे.

जाहिरात क्षेत्रात दीर्घ काल असल्यामुळे
एक महत्वाचे गुपित सांगतो,
बहुधा ८०% जाहिराती ह्या तुम्हाला
१.भीती २.हाव ३.भावना ह्यावर
आधारलेल्या असतात. उरलेल्या
२०% वस्तूच्या गुणधर्मावर.

आता पुढील गणित तुम्ही सोडवा
जाहिरातीतील मीठ घेणारी बाई अंदाजे ४५ वर्षे
मीठ विकणारी बाई अंदाजे ३२ वर्षे
शुद्ध मीठ बाजारात आल्याचे साल २०१९
ह्या दोघीच्या पोटात आज पर्यंत किती %रसायने
अशुद्ध मिठाने गेली असतील? त्याचा त्यांच्यावर
किती परीणाम झाला असेल?

केवळ भीती घालून केले ना तुम्हाला मूर्ख?
ग्राहका जागृत रहा!


Monday, June 3, 2019

पेहचान कौन


काल रात्री,नेहमीच्या वेळेस,  
डोळे मिटून बिछान्यात येऊन पडलो,
बराच वेळ झाला, कां कुणास ठाऊक
झोप काही केल्या डोळ्यातून मेंदूत शिरत नव्हती,
चाचपडत सेल फोन शोधला  फोनवर
श्रेया घोशालला अंगाई  गीत गाण्यास बोलाविले
ती गाऊन दमली आणि गेली




झोपेचे झालेले खोबरे तसेच,  
मग जुन्या मित्राला महमदला गा सांगितले
तोही चांगला तासभर  गायला असावा,दमला,
पण मेंदूचे घुबड काही झोपेना,
सेल फोनला विश्रांती दिली  
एव्हाना पहाटेचे ३ वाजून गेले
आकडे मोजून झाले, मेंढ्या मोजल्या,
मग पंतप्रधान मोदींचे नवे मंत्री मंडळही
नव्याने निवडले त्यांचा शपथ विधीही 
पार पाडला झोपेच्या आशेने,आता मनाचा टी वी बंद केला,
तरीही झोप येईना मग स्वतःच
“ निंबोणीच्या ...”गुण गुणलो तरीही...
जागते रहो... कानात घुमतच होते
किल किल्या डोळ्याने घड्याळ पहिले चार वाजले
ध्यानाची उत्तम वेळ म्हणून उठून बसलो
पण ध्यानासाठी तनमन तयार होईनात
मग तसाच डोळे घट्ट मिटून झोप येईल 
ह्या आशेने बसून राहीलो, एव्हढ्यात...
शांततेत रात्रपाळीच्या पाहरेकऱ्याच्या
फोनवरून गाण्याचे बोंल कानावर पडले
मी कुत्र्यासारखे कान टवकारले कानोसा घेत
गाण्याचे सुमधुर आवाजातील बोल ऐकू लागलो  
स्मित हास्य करीत बसल्या स्थितीतून हळू हळू खाली सरकत गेलो
डोके उशीवर कधी घरंगळले...
...जाग आली तेव्हां आता वाजले की बारा परिस्थिती !!
एवढ्या सुमधुर आवाजाची किमया/जादू/
जगाच्या पाठीवर कोठेही असणे अशक्य
 ते जादूचे गाणे...
धीरे से आजा री अंखियनमे
निन्दिया आजा री आजा, धीरे से आजा
छोटेसे नैन की बगीयन मे...
गायक? पहचान कौन.,.

Monday, May 13, 2019

‘मदर्स डे




पश्चिमेचे वारे आपल्या संस्कारात वाहू लागल्यापासून आपण भारतीय देखील मोठ्या आनदाने हे वेग वेगळे ‘दिवस’(डे)साजरे करू लागलो काल काय तर  फादर्सडे, उद्या फ्रेन्डशिप डे,परवा सिब्लीन्ग्स डे, येरवा टीचर्स डे, मग येणार नेबरस, त्यानंतर अनिमल्स, मग इस्टर सन डे,


‘मदर्स डे’
सकाळ सकाळीच मुलांचा फोन अमेरिकेहून
आपल्या  आईस ‘मदर्स डे’च्या शुभेछा देण्यास
खणखणला.
माझ्या आईच्या भाग्यात ह्या शुभेच्छां नव्हत्या.
पण तिची आठवण मात्र ह्या निमित्ताने
रोजच्या पेक्षा थोडी अधिक झाली व डोळ्यासमोरून
५७ वर्षाच्या तिच्या सहवासाचा चलचित्रपट
५७ सेकंदात सरकला,मनोमनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
तिची जेव्हां जेव्हां आठवण येते... न कळत ओठावर
प्रेमस्वरूप आई वात्सल्य सिंधु आई...
ह्या माधव जुलियन यांच्या कवितेतील
हे कडवे प्रकर्षाने गुणगुणले जाते.

वाटे इथून जावे तुझ्यापुढे निजावे
नेत्री तुझ्या हसावे , चिती तुझ्या ठसावे
वक्षी तुझ्या परी हे केव्हां स्थिरेल डोके
देईल शांतवाया ह्त्स्पंद मंद झोके 
घे जन्म तू फिरुनी येईन मीही पोटी
खोटी ठरो न  देवा  हि एक आस मोठी

अर्थातच माझ्याप्रमाणे असंख्य,अगणित आई विना असतील 
ज्यांना आईची उणीव रोजच भासत असेल
रोजच मनोमनी 'मदर्स डे'च्या शुभेछा 
आपल्या आईस देत असतील.

भूतलावरील सर्व माताना माझा प्रेमपूर्वक नमस्कार.
happy mother's day. 



Tuesday, May 7, 2019

वावटळ५



अनेक वेळा डोक्यात विचार एकाच वेळेस कल्लोळ करतात व वावटळी सारखे डोक्यात फिरत राहतात त्यांचा एकमेकाशी कसलाही मेळ नसतो.अशीच एक वावटळ .    


 मरणांत खरोखर जग जगते
अधिं मरण अमरपण ये मग ते ॥
अनंत मरणे अधीं मरावी
स्वातंत्र्याची आस धरावी
मारिल मरणचि मरणा भावी
मग चिरंजीवपण ये मग ते ॥ १ ॥
ब्लॉगच्या आयचा घो !!
पूर्ण दिवस काय लिहावे ह्यातच गेला
नाराजीचा फुत्कार टाकीत पी सी बंद केला
उद्याचा दिवस कारणी लागेल ह्या आशेने,
नाहीतर... ब्लॉगच्या आयचा घो भाग दुसरा !!

मन कधीच कुणाचे बांधील नसते
त्याचा स्वैराचार झोपेतही चालू असतो 
का?

कधी?
केव्हां?
कोणी?
कुठे?
कुणाला?
कशाला?
उन्हात केस पिकवायला?
कशासाठी?
कुणासाठी?
तुझ्यासाठी?
माझ्यासाठी?
सर्वांसाठी?
कधीतरी,केव्हांतरी?
सांग पाहू?
असाला की मसाला
चार शिंगे कशाला?
सांग पाहू ?
अंग नाचे तंग नाचे
तंगाची दोरी नाचे
मी नाचे बाबू नाचे
बाबूची शेंडी नाचे.

इथे सुरु होण्या आधी संपते कहाणी साक्षीला केवळ 
उरते डोळ्यातील पाणी.


  



Sunday, May 5, 2019

६मे








सकाळ झाली,जाग आली,
पापण्यात उरलेली झोप घेऊन उठून बसलो,  
घरात मात्र सामसूम
सर्वांची जणू मध्यरात्र 
पक्ष्यांची किल बिल, हळुवार येणारी मंद झुळुक
चंद्रकोरीचे सूर्याआड होणारे अस्पष्ट दर्शन,
देऊळातील घंटानाद,चर्च मधील पियानो,
मशीदितील बांग, तांबडे फुटलेले आकाश,
अस्पष्ट ऐकू येणारा रेडीओ,
वाहनाची सुरु झालेली वर्दळ,ऐकली नाही  
तर उजाडणारा दिवस देखील
झोपलेला वाटतो ... 
सवयी प्रमाणे डोळ्यासमोर वार,तारीख आली 
आज सोमवार, ६मे २०१९, 
आज आई १०४ वर्षाची झाली.
माते, असशील तेथे,
तुझा वाढ दिवस सुखाचा जावो...
तुझे आशीर्वाद,
हीच आमची अनमोल ठेव.

खुर्ची

  खुर्ची ऑफिसमध्ये एकदा एकटाच बसलो होतो. समोर माझी खुर्ची होती. रोजचीच. अनेक वर्षे वापरलेली. त्या दिवशी मात्र पहिल्यांदाच तिच्याकडे नीट...