८ सप्टेंबर,
मत माउलीचा जन्मदिवस.
जत्रा भरते.
मत माऊलीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
८ सप्टेंबर,
मत माउलीचा जन्मदिवस.
इयता ५ वीत न्यूटनच्या ‘गुरुत्वाकर्षण’ शोध आणि ‘गुरुपोर्णिमा’ह्यात विशेष फरक नाही हे मत मी मनोमनी पक्के केले होते. त्याच वेळेस मराठी व्याकरणात शब्दाची संधी फोड शिकत होतो.
गुरुत्वाकर्षण’= गुरु + त्वा (तूझे ) + आकर्षण
म्हणजेच :
ज्या व्यक्तीस आपण ज्ञान देणारा’ मानतो त्याच्या कडे आपण आकर्षित झालेलो असतो. म्हणजेच
‘गुरुत्वाकर्षण’= ‘गुरु पोर्णिमा’ हे समीकरण माझ्या बालमना (?) पासून ते आजतागायत रुतले आहे.
असो.
त्याच लहान शाळेतून मोठ्या शाळेत (ईयता ७वी) गेलो तेव्हा वर्गात पुनर्वसन केलेल्या मुलांच्या होणाऱ्या
सवांदावरून “चांदोरकर बाई’ म्हणजे ‘गुरूत्वाकर्षण.’मेंदू थोडा गोंधळला अर्थ खरा कोणता न्यूटन की बाई?
म्हणजेच चांगल्या शिकवणाऱ्या (?) समजावणाऱ्या शिक्षकाविषयी वाटणारे आकर्षण
कसे
काय?
ह्याचे उत्तर मी स्वतःस दिले की जो गुरु गुरुपोर्णीमेस आठवत नाही ते गुरूत्वाकर्षण नव्हे.नोकरीत देखील आपला
वरिष्ठ हा आपला गुरु, हा समज मात्र एकलव्या प्रमाणे दुरूनच अनुभवले.
आपल्याला आयुष्याचे मार्गदर्शन करणारा गुरु शोधायला हवा हे मनाशी पक्के केले पण ह्या गुरूला शोधावयाचे कुठे? हे काही समजेना ‘वेळ येईल तेव्हा बघू’ अशी स्वतः ची समजूत काढली. जसा कामातून मोकळा झालो तेव्हां
पुन्हा ‘गुरु’ शिवाय मोक्ष नाही असे बऱ्याचदा कानावर पडू लागले.
काही बोधप्राय वाचनात देखील आली, जसे.
गुरु म्हणजे एक बासरी आहे : जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि
गुरु म्हणजे एक अशी कृपाच: असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि
गुरु कुबेराचा अक्षय्य पात्र आहे: त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
गुरू म्हणजे एक प्रसाद आहे: ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही.
असे बरेच कानावरून गेले आणि मी चांगलाच संभ्रमात
पडलो
कारण...
आतापर्यंत झालेले महात्मे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, तसेच साई बाबा,शेगावचे गजानन महाराज, अक्कल कोटचे
स्वामी समर्थ, ह्यांना देखील माझा नमस्कार एक अद्भुत शक्ती म्हणूनच नम्रपणे होतो.
अंध श्रद्धेचा फायदा घेणारे आसाराम बापू सारखे अनेक गुरु वावरताना पाहून ‘गुरु’हा केवळ
शब्द असावा असे वाटू लागते.
अजूनही गुरु भेटेल हि आशा मात्र आहे ज्या दिवशी मला 'गुरु' लाभेल त्या दिवशी ‘गुरूत्वाकर्षण.’ चा अर्थ
समजेल अशी अशा बाळगून आहे.
गुरुपोर्सणिमे निमित्, सर्व गुरुजनाना समर्पित.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
चाळताना एका च्यानलवर राष्ट्रीय पुरस्कार
मिळालेला चित्रपटाचे नाव झळकले व मी थांबलो व उत्कंठेने चित्रपट पाहू लागलो. १५/२०
मिनिटात लक्षात आले कि चित्रपट अल्झामाय्रर (स्मृती भ्रंश) झालेल्या एका विद्वान
प्रोफेस्सरच्या अवस्थेवर आधारीत कथा असावी.
पण ह्या प्रसिद्ध कथा लेखिकेचा / दिग्दर्शिकेचा
कोठेतरी गोंधळ झाला व आपण हत्ती बद्दल लिहावे कि माहूतां बद्दल की माहुताच्या प्रेमळ
बायको बद्दल कि प्रोफेसरच्या सतत रडका चेहरा घेऊन फिरणाऱ्या मुली बद्दल कि उगाचच पात्रे
वाढविण्याकरिता घेतलेली जावई व नात ह्यांच्या बद्दल कि मुंबईहून काम सोडून आलेल्या
मुली बद्दल कळेनासे झाले.
त्यामुळे बाईना दिग्दर्शन देखील कायकरावे समजेनासे झाले.
पण आपल्या कथीत हुशार परीक्षकांना ही
लेखिकेची कसरत ( हत्तीला मुख्य भूमिका दिलेली) आवडली असावी. किंवा त्या वर्षी एकच
मराठी चित्रपट असावा, परीक्षकानी बाईंच्या इभ्र्तीस धक्का नको म्हणून तिच्या केसात
आणखी एक बक्षिसाचा गजरा माळून वादाला तोंड नको म्हणून आपले अस्तित्व राखले. ( तेही राष्ट्रीय पुरस्कार देऊन?)
माझा आवाज काही ह्या परीक्षकांच्या कानावर पडणार नाही पण मी माझ्या डोक्यातील किडा काढून टाकल्याचे मला समाधान. .परीक्षक हो थोडे तरी धीट व्हा. काळ्याला काळा म्हणा. एकमेकाची पाठ खाजवणे सोडा.
माझ्या चार/पांच वाचकानो वेळ मिळाला तर ‘STILL
ALICE’ हा चित्रपट जरूर पहा..
अस्तु.
”डीलिट ”
आमचा
शेजारचा नातू अर्जुन
आमच्याकडे सवयी प्रमाणे येऊन बसला होता
माझ्याशी बडबड चालूअसताना अंजलीने त्याला विचारले
“अर्जुना
आजी कुठे बाहेर गेलीय का रे?”
एक सेकंद
विचार करून म्हणाला
आजीचा
मामा ‘paased away so she has gone there’
Arjun: you have his number/
Arjun:
You deleted?
A
quick reaction from him surprised us,
त्याला म्हणयचे होते कि तो (मामा) वारला कळल्यावर
तू लगेच नंबर डिलीट देखील केलास?
हे चिमखडे
बोल बरेच काही सांगून गेले.
एखाद्यास
देवाज्ञा होणे म्हणजेच
पृथ्वी वरून त्याचे डिलीट होणे,
अभिनेता डिलीट झाला आणि
आज लाखो दिलोंकी धडकन ऋषी कपूर डिलिट झाला.
कोरोना महामारीत आता असंख्य डीलीट होतील.
माणसाचे अस्तित्व संपणे.
काही
दिवसातच एखाद्याचे मरण
म्हणजे
“अरे कालच अशोक डिलीट झाला”
एका नवीन वाक्प्रचाराचा पायंडा पडेल.
आमच्या छोट्या अर्जुनाला मात्र त्याचा मागमूसही नसेल.
आता जेव्हां जेव्हां मी डीलीट
प्रेस करेन तेव्हा मी गेल्यावर मित्र म्हणतील
"डिलीट" झाला बिचारा.
*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आले, मेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.
बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...