Monday, September 7, 2020

 ३६५ दिवस  गेले उडून भुर्रकन.

८ सप्टेंबर, 

मत माउलीचा जन्मदिवस.

तिच्या वाढदिवसाच्या निमिताने येथे ७ दिवस 
जत्रा भरते. 
यंदा जत्ना नाही आणि लाडक्या देवीचे दर्शन देखील होणार नाही. ४२ वर्षाचा दर्शनाचा शिरस्ता मोडणार.तिच्या पाय्थ्याशी आमची ४२ वर्षे गेली. 
या वर्षी माउली तुला पाय्थ्यावरून नमस्कार. 
जगभरात पसरलेल्या महामारीस आता थांबव हीच तुझ्या चरणी प्रार्थना, 

मत माऊलीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
आणि आमच्या ठाकरे बाबाना देखील वाढ दिवसाच्या शुभेच्छा .



Friday, August 21, 2020

सारे कसे शांत शांत!

 

सारे कसे शांत शांत!

तसे काही घडत नव्हते
दिवस उजाडत होता
दुपार शांत
संध्याकाळ शांत
रात्र काळोखात शांतपणे लपत होती
उन्हाळा तापवून शांतपणे निघून गेला
पावसाळ्याने मात्र महाराष्ट्राला
नाकी नऊ आणले.

एका छोट्याशाकोरोनाव्हायरसने
विश्व हलवून सोडले होते,

परमेश्वरांनी मात्र शांतता पाळण्याचे
संदेश कोरोना’ करवी दिले होते
कृष्ण जन्म,दही कालां देखील  यंदा 
शांतेत पार पडला ना गाजा ना बाजा  

 भक्तीचे ओंगळ प्रदर्शन,
भ्रष्टाचार विभ्त्सपणा'थांबावा
म्हणून खऱ्या भक्तांना घरीच भेट 
देण्याचे देवानी ठरविले असावे. 

 ‘श्री गजानना’ उद्या तुमचे आगमन
देखील घरा घरात शांतपणे होईल.
सार्वजनिक स्थापनेचा गोंधळ बंद 

आपण सुरु केलेल्या रिवाजाचे 
झालेले भयाण स्वरूप यंदा नाही हे पाहून
आपल्या १०० व्या पुण्य तिथीस
लोकमान्य  देखील खुशीत  असतील 
  


अनंत चतुर्थीच्या दिवशी
ना मिरवणुका ना गर्दी
बाप्पाला,जड अंतकरणाने भक्त 
मनातल्या मनात निरोप देतील.

“गणपतीबाप्पा मोरया
पुढच्यावर्षी लवकर या”
ह्या गर्जना देखील
कानगोष्टी प्रमाणे ऐकू येतील.

...पुन्हा
सारे कसे शांत शांत!

 मी मात्र...

तुमचे प्रार्थनेने स्वागत करतो ...

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ 
निर्विघ्न कुरुमेव देवो सर्वकार्येषु सर्वदा.

' गणपती बाप्पा मोरया !!!
पुढच्या वर्षी लवकर या!

कोरोना कधी जाणार
हे केवळ बाप्पास ठाऊक.

Saturday, July 4, 2020

गुरुत्वाकर्षण’= ‘गुरु पोर्णिमा’

गुरु पौर्णिमा 

इयता ५ वीत न्यूटनच्या ‘गुरुत्वाकर्षण’ शोध आणि  ‘गुरुपोर्णिमा’ह्यात विशेष फरक  नाही हे मत मी मनोमनी  पक्के केले होते.  त्याच वेळेस मराठी व्याकरणात शब्दाची संधी फोड शिकत होतो. 

गुरुत्वाकर्षण’= गुरु + त्वा (तूझे ) + आकर्षण 

म्हणजेच :

ज्या व्यक्तीस आपण ज्ञान देणारा’ मानतो त्याच्या कडे आपण आकर्षित झालेलो असतो. म्हणजेच

‘गुरुत्वाकर्षण’= ‘गुरु पोर्णिमा’ हे  समीकरण माझ्या बालमना (?) पासून  ते आजतागायत रुतले आहे.

असो.

त्याच लहान शाळेतून मोठ्या  शाळेत (ईयता ७वी) गेलो तेव्हा वर्गात पुनर्वसन केलेल्या मुलांच्या होणाऱ्या 

सवांदावरून  “चांदोरकर बाई’ म्हणजे ‘गुरूत्वाकर्षण.’मेंदू थोडा गोंधळला अर्थ खरा कोणता न्यूटन की बाई?

म्हणजेच चांगल्या शिकवणाऱ्या (?) समजावणाऱ्या शिक्षकाविषयी वाटणारे आकर्षण 


कसे काय?

ह्याचे उत्तर मी स्वतःस दिले की जो गुरु गुरुपोर्णीमेस आठवत नाही ते गुरूत्वाकर्षण नव्हे.नोकरीत देखील आपला 

वरिष्ठ हा आपला गुरु, हा समज मात्र एकलव्या प्रमाणे दुरूनच अनुभवले.

आपल्याला आयुष्याचे मार्गदर्शन करणारा गुरु शोधायला हवा हे मनाशी पक्के केले पण ह्या गुरूला शोधावयाचे कुठे?  हे काही समजेना ‘वेळ येईल तेव्हा बघू’ अशी स्वतः ची समजूत काढली. जसा कामातून मोकळा झालो तेव्हां 

पुन्हा ‘गुरु’ शिवाय मोक्ष नाही असे बऱ्याचदा कानावर पडू लागले.

काही बोधप्राय  वाचनात देखील आली, जसे.

गुरु एक असे तेज आहे ज्यांनी मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.

गुरु म्हणजे असे ज्ञान: की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. 

गुरु ही एक अशी दीक्षा आहे: की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा. 

गुरु ही एक अशी नदी आहे: जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते. 

गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे: जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. 

गुरु म्हणजे एक बासरी आहे : जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि 

शरीर आत्मानंदात मग्न होऊनजाते.

गुरु म्हणजे केवळ अमृतच: ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते. 

गुरु म्हणजे एक अशी कृपाच: असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि 

काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.

गुरु कुबेराचा अक्षय्य पात्र आहे: त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.

गुरू म्हणजे एक प्रसाद आहे: ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही. 

असे बरेच कानावरून गेले आणि मी चांगलाच संभ्रमात पडलो

कारण...

आतापर्यंत झालेले महात्मे संत ज्ञानेश्वर, तुकाराम, तसेच साई बाबा,शेगावचे गजानन  महाराज, अक्कल कोटचे 

स्वामी समर्थ, ह्यांना देखील माझा नमस्कार एक अद्भुत शक्ती म्हणूनच नम्रपणे होतो.

अंध श्रद्धेचा फायदा घेणारे आसाराम बापू सारखे अनेक गुरु वावरताना पाहून ‘गुरु’हा केवळ 

शब्द असावा असे वाटू लागते.

अजूनही गुरु भेटेल हि आशा मात्र आहे ज्या दिवशी मला 'गुरु' लाभेल त्या दिवशी  ‘गुरूत्वाकर्षण.’ चा अर्थ 

समजेल अशी अशा बाळगून आहे.

गुरुपोर्सणिमे निमित्, सर्व गुरुजनाना समर्पित.

 

 

*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.

 


Saturday, May 30, 2020

मानाचा (?) गजरा.



गेल्या आठवड्यात झोपण्याआधी  रिमोटने टीवी चाळत होतो,

चाळताना एका च्यानलवर राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला चित्रपटाचे नाव झळकले व मी थांबलो व उत्कंठेने चित्रपट पाहू लागलो. १५/२० मिनिटात लक्षात आले कि चित्रपट अल्झामाय्रर (स्मृती भ्रंश) झालेल्या एका विद्वान प्रोफेस्सरच्या अवस्थेवर आधारीत कथा असावी.

पण ह्या प्रसिद्ध कथा लेखिकेचा / दिग्दर्शिकेचा कोठेतरी गोंधळ झाला व आपण हत्ती बद्दल लिहावे कि माहूतां बद्दल की माहुताच्या प्रेमळ बायको बद्दल कि प्रोफेसरच्या सतत रडका चेहरा घेऊन फिरणाऱ्या मुली बद्दल कि उगाचच पात्रे वाढविण्याकरिता घेतलेली जावई व नात ह्यांच्या बद्दल कि मुंबईहून काम सोडून आलेल्या मुली बद्दल कळेनासे झाले.

त्यामुळे बाईना दिग्दर्शन देखील कायकरावे समजेनासे झाले.

पण आपल्या कथीत हुशार परीक्षकांना ही लेखिकेची कसरत ( हत्तीला मुख्य भूमिका दिलेली) आवडली असावी. किंवा त्या वर्षी एकच मराठी चित्रपट असावा, परीक्षकानी बाईंच्या इभ्र्तीस धक्का नको म्हणून तिच्या केसात आणखी एक बक्षिसाचा गजरा माळून वादाला तोंड नको म्हणून आपले अस्तित्व राखले. ( तेही  राष्ट्रीय पुरस्कार देऊन?)

माझा आवाज काही ह्या परीक्षकांच्या कानावर पडणार नाही पण मी माझ्या डोक्यातील किडा काढून टाकल्याचे मला समाधान. .परीक्षक हो  थोडे तरी धीट व्हा. काळ्याला काळा म्हणा. एकमेकाची पाठ खाजवणे  सोडा.

माझ्या चार/पांच वाचकानो वेळ मिळाला तर STILL ALICE’ हा चित्रपट जरूर पहा..

अस्तु.


Monday, May 18, 2020

”डीलिट ”

 

 

 

 ”डीलिट ”

 

 

आमचा शेजारचा नातू अर्जुन

 आमच्याकडे सवयी प्रमाणे येऊन बसला होता 

माझ्याशी बडबड चालूअसताना अंजलीने त्याला विचारले

“अर्जुना आजी कुठे बाहेर गेलीय का रे?”

एक सेकंद विचार करून म्हणाला

आजीचा मामा paased away so she has gone there’

 Anjali: I knew him

Arjun: you have his number/

Anjali: No

Arjun: You deleted?

A quick reaction from him surprised us,

त्याला म्हणयचे होते कि तो (मामा) वारला कळल्यावर

तू लगेच नंबर डिलीट देखील केलास?

हे चिमखडे बोल बरेच काही सांगून गेले.

एखाद्यास देवाज्ञा होणे म्हणजेच

 पृथ्वी वरून त्याचे  डिलीट होणे,

 काल इरफान खान सारखा प्रतिभावंत कलाकार /

अभिनेता डिलीट झाला आणि

आज लाखो दिलोंकी धडकन ऋषी कपूर डिलिट झाला.

कोरोना महामारीत आता असंख्य डीलीट होतील.

 ह्यापुढे ‘ डी’ म्हणजे पृथ्वीवरून

माणसाचे अस्तित्व संपणे.  

काही दिवसातच एखाद्याचे मरण

म्हणजे “अरे कालच अशोक डिलीट झाला”

 एका नवीन वाक्प्रचाराचा पायंडा पडेल.

आमच्या छोट्या अर्जुनाला मात्र त्याचा मागमूसही नसेल.

आता जेव्हां जेव्हां मी डीलीट

प्रेस करेन तेव्हा मी गेल्यावर मित्र  म्हणतील 

"डिलीट" झाला बिचारा.


*ह्या वेड्यावाकड्या विचारांचा खचखोळ वेळोवेळी माझ्या वेड्या समाधानाकरिता कागदावर  उतरवीत गेलो. ह्या ना कविता, ना लेख,ना गोष्टी, ना बाल गीते,मनी जसे आलेमेंदूला जसे दिसले तसे वहीत उतरविले,हा प्रयत्न कुठल्याही वांग्मय प्रकारात शोधूनही सापडणार ना मोडणार.माझा हा टाईमपास आवडल्यास तुमचा टाईमपास करण्यास वाचावे.ह्यात शोध/बोध् घेण्यासारखे काहीही नाही,काही असले अथवा दिसले तर ते माझे abstract सेल्फ portrait असे समजावे.


Monday, April 20, 2020

गोड गोड गुपित


सारे जग हादरून गेलेय
कोरोना व्हायरसने.
गाला प्रथमच कुलूप
लागले.
अथक प्रयत्नाने देखील 
कुठल्याही देशाला आज पर्यंत 
ह्या कुलुपाची चावी बनविण्यास
यश आले नाही.
एकाहून एक महान देश थकले
ज्याची ओरिजिनल चावीच
कोणी पहिली नाही त्यांना
डूप्लीकेट कशी बनवता येणार.
काय सांगावे,बनवतील देखील.


असो,
लहान तोंडी मोठा घास!
“घरातील टीव्ही लाऊ नका.”
त्यावरील मृतांची व इतर आकडेमोड  
आणि रोज मरे त्याला कोण रडे असा  
लोकांचा स्वैराचार पहिला तर
उगाचच धडकी भरते.
जमल्यास, ती वेळ आपआपल्या
आवडी नुसार सत्कारणी लावा.
असे रिकामे दिवस पुन्हा येणे नाहीत.

काल मी नेटवर फेरी मारत असतांना
आपले लाडके कवी मंगेश पाडगावकरांच्या
चार ओळी सापडल्या बघा
तुम्हाला आवडतात का?

१ ‘ प्रत्येकाच्या मनात एक  
गोड गोड गुपित असत,
दरवळणारे अत्तर जस
इवल्याश्या कुपीत असते. ‘

२ करून करून हिशोब धूर्त
खूप काही मिळेल
पण फुल का फुलत
हे कसे कळेल?

३ कोऱ्या कोऱ्या कागदावर
असल जरी छापल,
ओठावर आल्याखेरीज
गाण नसत आपल

आणि मला आवडलेल्या
चार ओळी
“ सांगा कस जगायचं
कण्हत कण्हत की गाण
म्हणत तुम्हीच ठरवा."

अफाट साहित्याचा समुद्र
आपली अनमोल ठेव  

मराठी  साहित्य  समुद्रातील    
मी एक ओंजळ भर जरी साहित्य 
वाचले तरी आयुष्याचे सार्थक
झाल्याचे समाधान  मला लाभेल.
  





Thursday, April 2, 2020

काळ


वेळ, 
ज्याला लागत नाही
ह्याला कधी कोठेही कोणीही प्रवेश
नाकारू शकत नाही,
सांगून ह्याचे येणे
फार क्वचितच,  
मन मानेल तेव्हां
एकाच वेळेस अनेक जागी
फक्त हाच जाऊ शकतो,
ह्याच्या डायरीचा हिशोब
लागणे कठीण, त्याच्या
मनात आले कि तो हजर,
त्याला अनेक रूपे
कुठले रूप घेऊन
तो समोर कधी उभा ठाकेल
आज पर्यंत कोणी सांगू
शकले,
शकणार,
नाही.
त्याला देश
नाही वेश नाही,
रंग रूप तो ठरवेल तेच
तो आपली भेटीची वेळ स्वतः ठरवितो.
एका लाटेत शेकडो,हजारो, लाखो
तो बासरीवाल्या सारखा
एकाच वेळेस घेऊन जातो.
सध्या कोरोना या नावाने जगात
त्याने धुमाकूळ घातलाय.
आज मितीस त्याने ५००००
लोकांना आपल्या सदनात नेले आहे.
त्याला कसा थांबवावा ह्याचे उत्तर
काही सापडत नाहीय, मनुष्यप्राणी 
काकुळतीला आलाय.
त्याचे थैमान तोच थांबवेल.
तो पर्यंत कितीना आपले सदन
दाखवेल हे देखील त्यालाच माहित.
आता केवळ त्याच्या कलाने घेणे
घरात बसून त्याच्या दृष्टीस न पडणे
हाच उपाय.
घरात राहाल तर 
सुखरूप रहाल,
Home safe Home.


बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...