Thursday, November 30, 2023

राजकीय चिखल


राजकीय चिखल

महाराष्ट्र




राष्ट्र




अराज का? रण. 
सध्या देशात राजकारण म्हणजे दुसऱ्या पक्षावर चिखल फेकणे व आपण स्वच्छ असल्याचा दावा करणे.
राजकर्त्या पक्षा विरुद्ध "ब्र" काढलात की तुमच्या पाठीमागे इनकम टॅक्स,  ई डी, पोलीस,ह्यांचा ससेमिरा लागलाच समजा.कुठलाही टीव्हीचॅनल लावा ह्यांनी त्याला,फटकारकले त्यांनी त्यास धक्का दिला ,आज ह्याच्या घराची झडती,उलटतपासणी त्याची सुरु झाली चिन्ह खटला, पार्टी पळविणे, चोरांना आश्रय देणे, हिंदुत्व, आरक्षण मिळविण्यासाठी खोत जातीचे दाखले ह्या गोष्टी रोज दात घासण्या सारखे झाले आहे. एकूण संपूर्ण देश चिखलाने बरबटलेला आहे. 




दूर दृष्टी
देख तेरे संसार की हालत क्या हो गयी भगवान,

कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान,
सूरज ना बदला,चाँद ना बदला,ना बदला रे आसमान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

आया समय बड़ा बेढंगा,आज आदमी बना लफंगा,
कहीं पे झगड़ा,कहीं पे दंगा,नाच रहा नर होकर नंगा,
छल और कपट के हांथों अपना बेच रहा ईमान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

राम के भक्त,रहीम के बन्दे,रचते आज फरेब के फंदे,
कितने ये मक्कार ये अंधे,देख लिए इनके भी धंधे,
इन्हीं की काली करतूतों से हुआ ये मुल्क मशान,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

जो हम आपस में ना झगड़ते,बने हुए क्यूँ खेल बिगड़ते,
काहे लाखो घर ये उजड़ते,क्यूँ ये बच्चे माँ से बिछड़ते,
फूट-फूट कर क्यों रोते प्यारे बापू के प्राण,
कितना बदल गया इंसान..कितना बदल गया इंसान ||

स्वर - प्रदीप कुमार
फिल्म - नास्तिक (1958)

Wednesday, November 29, 2023

"अलबेला"

 






हिंदी सिने सृष्टीतील संगीतकार म्हणून एक अढळ स्थान मिळविलेला "ध्रुव तारा'." 


रेल्वे स्टेशन मास्तरांचा मुलगा. तारुण्यात सिनेमा नाटकाचे वेड लागलेला "अलबेला". 

१७वर्षांचा, नववी पास घर सोडून कोल्हापूरला येतो लवकरच "नागानंद" सिनेमात भूमिका पटकावतो तोंड घशी पडल्यावर हिरो होण्याचे वेड सोडून मुंबईचा रस्ता धरतो. आता तो आपल्या दुसऱ्या प्रेमाकडे "संगीता "कडे वळतो.

गंधर्व महा विद्यालयात विनायक बुवा, गोविंदराव पटवर्धन ह्यांच्या कडून शिक्षण घेतो व सिनेमात छोट्या भूमिका जशा मिळतील तशा करतो. सिनेमाची कधी न ऐकलेली  नावे 'आत्मा तरंग' "सैदे हवंस' १९३६ /३७.


ओळखलंत का कोण? नाही ना पुढचा प्रवास वाचा. 

मिनर्व्हा थिएटर मधील संगीतकारांना पेटीची साथ करता करता एक दोन तामील फिल्मना संगीत देतो.

ह्या अलबेलाच्या उडत्या गाण्यांना वेस्टर्न गाण्यांचा साज होता, तसेच हिंदुस्थानी गाण्यास रागदारीची झालर होती. ओळखलंत का? नाही मग चला पुढे, ह्याच्या संगीतास तारुण्याचा उन्माद ठासून भरलेला त्यांनी सेक्साफोन च्या जोडीला गिटार आणि माऊथ ऑर्गन ची जोड देऊन हा उन्माद खरा ठरवला ."आना  मेरी जान" "शोला जो भडके" ह्यात बॉन्गो, सेक्साफोन वापरून रॉक म्युझिक ची ओळख बॉलीवूड मध्ये आणली. पहा आठवून " इन मीना डिंका " सारखे अजरामर गाणे तुमचे पाय आपोआप ठेका धरतील. १९४२ च्य सुमारास हे साहेब त्याकाळातील विनोदी अभिनेता भगवान दादांना भेटले  आणि चमत्कारास  सुरुवात झाली केवळ वयाच्या २४ वर्षी,  "ललकारी," "सम्राट चन्द्र गुप्त", "भक्तराज" फिल्म्स ने त्याच्या उदयास सुरुवात झाली, भक्तराजच्या प्रोड्युसर जयंत देसाई यांनी  त्याचे नावच बदलून टाकले मग काय विचारता सूर्यउदय झाला, आता तरी ओळखलंत,  

बरोबर! दुसरे तिसरे कोणी नसून हा 'अलबेला' म्हणजे सी. रामचंद्र सर्वांचे लाडके अण्णा.  

अण्णा प्लेबॅक देताना मात्र खरे नाव 'चितळकर' लावीत.

(जो पर्यंत मी नाव सांगत नव्हतो तो पर्यंत "अरे ""कारे",  मध्ये मी उल्लेख करत होतो जसे नाव उलगडले तसे माझ्या करवी आपोआप आदरार्थी सम्बोधन होऊ लागले.) 

अण्णांचा आवाज माझ्या तारुण्यात सुरु झाला. मी १० वीत होतो इंपिरिअल थेटरला भगवान दादांचं अलबेला, मी अकरावी पास होईपर्यंत ठाण मांडून बसला होता. 

अहो गाणी आठवा... 'भोली सुरत, शोला जो भडके, धीरेसे आजारे..." सिनेमातले प्रत्येक गाणे हिट अण्णांच्या म्युझिक बरोबर भगवानदादा देखील उदयास आले. 

अण्णांचा दबदबा वाढला तो "अनारकली" नन्तर व तेव्हां खऱ्या अर्थाने "सी.रामचंद्र" हे नाव "झाले बहू होतील बहू " परंतु ह्या सम हा!" यादीत बसले .   अनारकली नन्तर अण्णा आणि लता दीदी हि जोडी अतूट झाली. लंडन मधील एका पत्रकाराने "अनारकली" पहिल्यांनंतर लिहिले कि सिनेमातील हिरोईन एखाद्या स्वर्गातल्या परी सारखी गायली, त्या बिचाऱ्याला लता दीदी माहित नव्हती.

अण्णांची महती वाढतच गेली त्यात लता दीदीची साथ.  नवरंग, स्त्री, अनारकली,आझाद, नास्तिक, पतंगा,पैगाम,अनेक बहारदार संगीताने नटलेले चित्रपट ८०% गाण्याच्या मदारीवर चालले अहो हेच ते अण्णा ,"झाले बहू होतील बहू...अण्णांचा दरारा बॉलीवूड मध्य वाढू लागला, एस डी  बर्मन सारख्या नामी संगीतकारास देखील काही बदल सुचवलेत. तुम्हाला " थन्डी हवाये" गाणे आठवते का? त्यात "ला ला ला' ची जोड अण्णांनी सुचवली व गाणे हिट झाले असे हे "झाले बहू होतील बहू...  अण्णा.

१९५० चे दशक ह्या अलबेलाने गाजवले, अण्णांनी त्यांच्या उडत्या व भावूक गाण्यांनी देश गाजवला.

ह्या सर्व शिखरावर त्यांनी कळस चढवला तो १९५३ साली प्रजासत्ताक दिनी झालेल्या सोहळ्यात अजरामर गाण्याने. लता दीदी च्या गळ्यातून उतरलेली  "ऐ  मेरे वतन के लोगो" आर्त हाकेने पंडित जवाहरहलालजीनी देखील अश्रू ढाळले   आज ७० वर्षे, दर २६ जानेवारीस गल्लो  गल्ली  हे गाणे घुमते, अंगावर शहारे आणते, केवळ अण्णा तुमच्या संगीताने.


अण्णा तुम्ही माझ्यासाठी मात्र सदैव "झाले बहू होतील बहू.... " 




Sunday, November 12, 2023

दिपावली -

  दिपावली 



तुमची, माझी, आपली 

आली, आली,आली, यंदा बार उडवीत आली,

 

हसत, खुशीत, आनंदात, आली वाजत गाजत !

झगमग झगमग   झगमगाट पणत्यांचा,

दारोदारी पसरीत गालिचे रांगोळ्याचे !


ऐका गम्मत आमुच्या  घरची,

वर्शो न वर्षे न बदले काही  


मिट्ट काळोखी डोळे चोळीत 

पहाटेचे स्वागत करती भाव गीतांनी  


तेल उटणे लाउनी झाली तयारी, अभ्यंग स्नानाची

लहाना पासून मोठ्या पर्यंत झाली सज्ज, 

नटुनी तयार,घाई फराळ खाण्यासी


 लाडू, चकली, करंजी, अनारसे आणि चिरोटे, 

आईने, सजवली  फराळ ताटे,

सरसावून हात मारीती सारे  फराळावरी. 


आजीने उजवल्या पणत्या  अंगणात,

केले वाटप बाबांनी फुलबाजा,अनाराचे, 

 प्रसन्न होई मन पाहुनी, कारंजे, फुलबाजे फुलताना, 

 पाहून भुई चक्राला, सर सर  फिरताना वाटे, 

असेच असावे, चक्र सुदर्शन त्या गिरीधराचे. 

आली मावशी आली आत्या, 

पाहून मामा मामीला,

फुलली कळीआजीची, 

पाहिले तीस मी पदराने,

डोळे  हळूच टिपताना

गजबजले घर, अंगण, गप्पा शप्पाने . 

आली दिपावली घेउनी ४ दिवस 

कौटुंबिक जिव्हाळ्याचे,

ना समजले न उमजले 

कधी  गेले ४ दिवस मजेचे


हिरमुसली आजी एकली विचाराने 

 पाहीन का मी हा आनंद येत्या वर्षी 

 भरल्या डोळ्यांनी. 


जमले कुटुंब हळू हळू विखुरले

घर गजबजलेले, आता शांत झाले,

आली आली गेलीगेली दिपावली, 

आनंद पसरून.


Tuesday, October 31, 2023

ह्याला जीवन ऐसे नाव...

 गेल्या पंधरवड्यात कॉलेज मधील वर्गातीलएक मित्र व एक मैत्रीण गेल्याचे फोन वर

कळले. मेंदू सररर करून वर्गात जाऊन बसला, 
सर्व वर्गात नजर फिरली व गेलेल्या 
मित्राच्या जागेवर खिळली,. अर्थात त्याच्याबरोबर 
घालविल्या दिवसांची आठवणही उजळली. 
बातमी आलेली मैत्रीण खूप हुशार होती.
ह्या बातम्या आता अंगवळणी होत होत्या,

ह्या वरून मनात एक वावटळ  उठले.
वेग वेगळ्या वयात येणाऱ्या बातम्यांचे महत्व, 
स्वरूप त्याच वयात कळण्या सारखे असते

वय वर्षे ५/६ 
झाली कि अवती भवतीच्या
ह्या वयात आपल्याला वाढ दिवसाच्या बातम्या 
कानावर येतात आज बबनचां
वाढदिवस उद्या चिंगीचा... आनंदि आनंद 

वय वर्षे १० ते १५...
आर्या पहिली आली, विनोद ला ९०%
आशीर्वादला विज्ञान शाखेत प्रवेश मिळाला,
मालिनी चे अरंगेत्रम शुक्रवारी... 

वय वर्षे १६ ते २०...

देव आनंदचा ‘काला बाझार,’ मेकांनाज गोल्ड 
कसला तुफान, हिच्कोक भन्नाट डिरेक्टर,
नौशादने कसले म्युझिक दिलय यार...
अशोक इन्जिनिअरिन्गला गेला...
अनिल मेडिकलला जायचे म्हणतोय...

वय वर्षे २२ ते २५...

शिला, राम जेठमलानी बरोबर काम करते,
निर्मला मास्टर्स करायला यु एसला
गेली, वाडकरांचा सुरेष शिक्षण सोडून
गातो म्हणे,गणेशचे लग्न ठरलय,
रघु आणि मैना पळून गेले...

वय वर्षे २५ ते ३०...
सन्नी, मोहन,गंगा... जवळजवळ
सर्वांची लग्न झाली, आशुतोष नेहमीच
सर्वापुढे त्याला दोन लेकरे आहेत आणि
बंगळूर मध्ये स्थायिक देखील झाला...

 वय वर्षे ३५ ते ४५,,,
 
किशनचा वरूण लार्सेन मध्ये लागला,
जामसंडेकर अमेरिकेत सेटल झाला,
परवा गौरीच्या मुलीचे लग्न खांडेकरच्या
मुलाशी ठरले, राघव च्या पार्टीत कसली 
धमाल केली, जुन्या आठवणी गप्पाना उत
आला पहाटेचे ३ वाजले... बापटची आई वारली, 
सारंग चे वडील १५ दिवसापूर्वी गेले...

वय वर्षे ५० ते ६०...
 
साठेला प्यारेलेसीस झाला उजवी बाजू
कामातून गेली, काशीला डायाबेटीसने
फुल ग्रासलेय, हरीश आता मोदीचा
टेक्निकल सल्लागार झालाय वट वाढली 
लेकाचे करून करून भागले आणि...
वृंदा, भारत भारतात परतले 
पुण्यात सेटलझाले,शामच्या 
मुलाने आई बापाला केसरी 
मधून जग फिरवले


वय वर्षे ६५ ते ७५...

मधुकर गेला...हरीचे पण खरे नाही
शालिनी शिव गेल्या पासून एकटी पडली
घनश्याम वृद्धाश्रमात राहायला गेला,
मंदाकिनी मंदारचा आजार काढून थकलीय...

आपले काय?
आतापर्यंत तरी आल वेल...! 

अशा ह्या वयोपरत्वे बातम्या माझ्या
कानावर पडत गेल्या व त्यांचे ह्या 
वावटळीत शब्दांकन करावेसे वाटले.

ह्याला जीवन ऐसे नाव...



Monday, October 23, 2023

|| दसरा ||

 



सायंकाळी सोने लुटुनी मोरू परतुनि आला ।|
बहीण काशी ओवाळी मग त्याला ।| 
||दसरा सण मोठा,  नाही आनंदा तोटा||

माझ्या दसऱ्याच्या काही आठवणी.   


आमचे अण्णा आम्हाला दसऱ्यास सकाळी उठवताना " सकाळ झाली मोरू चा बाप मोरूस म्हणाला, आज दसरा,मोरू उठ. ,
 

त्या काळात आमच्या कडे आचार्य अत्रेंचा " मराठा" वर्तमान पत्र येत असे.  मंत्री मोरारजी देसाई यांच्यावर लिहिलेल्या 
आपल्या टीकेनी भरलेल्या दसऱ्याच्या अग्रलेखास अत्रेंनी सुरवात सकाळ झाली मोरू चा बाप मोरूस म्हणाला, आज दसरा,मोरू उठ. ह्या वाक्याने केली होती ही आठवण.
दसऱ्यास झेंडू व आंब्याच्या पानांचे तोरण अण्णा स्वतः दरवाज्यास बांधीत. आजही  माझ्या दरवाजात तोरण बांधताना डोळ्यासमोरून ही आठवण सरकते. दसऱ्याचे महत्व पांडवानी शमीच्या झाडावरील लपविलेली शस्त्रे उतरवली होती, त्यामुळे दसऱ्यास शमीची पाने एकमेका सोने म्हणून देण्याची प्रथा पडली असे आईने गोष्टीत सांगितल्याची आठवण.
ह्या दिवशी होणाऱ्या जेवणाची आठवण. वरण भात,वालाची उसळ,काकडीची कोशिंबीर, हिरवी कैरीची चटणी, पापड, आणि जेवणातील महत्वाचा व माझ्या आवडीचे श्रीखंड, किवां मसाला दूध  आजही मैना भुलुंगा.
आमच्याकडे तसे येणारे नातेवाईक फार कमी त्यामुळे सोने आम्ही भावन्डे आप आपसात वाटत असू,पुढे जे जे  त गेल्यावर मित्रपरिवारात वाटण्यास सुरवात झाली, आमचे एक सर मात्र सोन्या ऐवजी ग्रीटिंग कार्ड्स करायचे व आपल्या लाडक्या विद्यर्थ्यांना पाठवीतही आठवण. आमच्या दादाचे लग्न दसऱ्याचे ही  एक आठवण,  दसरा आला कि गेली काही वर्षे मोबाइल वरून सतत टिंग करत कोणी ना कोणीतरी शुभेच्छा पाठवीत  रहातात त्यांना वयोपरत्वे विसरू नये म्हणून लगेच आपल्या बाजूने रिटर्न सदिच्छा न विसरता न दुखवता पाठवण्याची आणखी एक आठवण, जी विसरून चालत नाही, मोबाइलच्या जन्मापासून सर्वाना हायसे वाटले असावे घर बसल्या सर्वाना सदिच्छा पाठवणे सोपे झालेय. ते देखील न भेटता. तेव्ढ्यावरून होणाऱ्या गैर समंजस टाळण्याची आठवण.
थोडक्यात माझ्याचसाठी दसरा ह्यावयात समरणशक्ती टेस्ट. आठवणी म्हणजे दसरा हे समीकरण माझ्या साठी.थोडक्यात माझ्याचसाठी दसरा ह्यावयात समरणशक्ती टेस्ट.   
    

* दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते. विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा आणि विजयादशमी अशी नावे आहेत. श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.





चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण म्हणजे दसरा. साडेतीन मुहुर्तांपैकी दसरा एक मानला जातो.चातुर्मासातअश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर दहाव्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो. या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसऱ्याला केले जाते. नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते

*
वरील माहिती गुगल च्या साहाय्याने घेतली आहे.

Saturday, October 21, 2023

महाअष्टमी



महाअष्टमी

आमच्या आई वडिलांनी आम्हा मुलांना कुठल्याही प्रकारे धर्म ह्यावर कधी भाषण दिले नाही किवां आपण हिंदू ते मुसलमान , ते ख्रिस्ती, ते पारशीअसा भेद भाव करणे हि शिकवले नाही त्यात हिंदूंचे जाती विभाजन देखील शिकवले नाही.घरात एक अण्णांचे कपाट होते त्यात वरच्या खणात रामाचे चांदीचे सिंहासन होते त्यात अण्णांचे राम पंचायतन चे एक नाणे होते ज्याची अण्णा आंघोळीनंतर  पूजा करीत आम्हाला कधीही सांगितले नाही कि तुम्ही रोज हात जोडलेच पाहिजेत वगैरे त्यानी शिकविलेला श्री राम, श्रीकृष्ण, व इतर दोन श्लोक मात्र नित्य नेमाने झोपण्यापूर्वी कपाटा  समोर उभे राहून म्हणावयास शिकविले होते तोच आमचा देवाशी कॉन्टॅक्ट,बाकी मार्केट मध्ये जाताना मारुतीचे एक देऊळ, व रस्त्यात झाडाला टांगलेले साई बाबा ह्याना लांबूनच नमस्कार करणे. तो देखील देखल्या देवा ... एक हात छातीस लावून. 

थोडक्यात सांगायचे तर आम्हा मुलांना फारशी सणावारांशी ओळख नव्हती.( म्हणजे सणाचे महत्व किवां का साजरे करतात, इतिहास वगैरे ) काही सण आई गोड पदार्थ करायची म्हणून कळायचे. होळीला पूरण पोळी, संक्रातीला तिळाचे लाडू, दसऱ्याला मसाले दूध, दिवाळीला फराळ वगैरे. 

अरे हो आमच्या घरी एक पुस्तक होते ते घरात कुणी कुणी वाचले होते कोणास ठाऊक.मी तर नाहीच नाही,पुस्तकाचे नाव होते हिंदू सण व व्रते, माझ्या लक्षात फक्त त्याचे कव्हर आहे. पिवळ्या रंगाच्या बॅकग्राऊंड वर एक वडाचे झाड व त्या भोवती फिरणाऱ्या बायका, आईनेच हे आणले असावे तिला वाचनाची खूप आवड. 

असो विषय थोडा लांबला.

माझे लग्न ठाकरे कुटुंबात झाले व माझी खऱ्या अर्थाने देवांशी ओळख झाली. मला सर्व सण व्रते यांची माहिती महती समजली. त्यातील नवरात्री एक महत्वाचा भाग. त्यांच्या कडे म्हणजे सासरी पहिल्या रात्री पासून सणाला सुरवात व्हायची म्हणजेच घट बसायचे,रोज माहेरी जाणे शक्य नसल्याने अंजली आता घरात तिच्या परीने देवीची पूजा, पोथी वाचन ९  दिवस करते, त्याबरोबर देवाचा प्रसाद रोज केला जातो. अष्टमीला मात्र आम्ही माहेरी, सासरी, गेली ४६ वर्षे जातोय.ह्या दिवसाचे महत्व मी अलीकडे गुगल करून माहिती केले. अंजलीच्या माहेरी अष्टमीला घरी देविचा  प्रसाद म्हणजे मटण, कलेजी. कोलंबी, मासे, गोडाचे पदार्थ ( ह्यातील अर्धा मासाहारी प्रसाद अंजली करते )ह्याने पूर्ण , तुडुंब, भरलेली परात येळकोट येळकोट जय मल्हार चा गजर करत,सर्वानी त्यास हाताने स्पर्श करावयचा असतो त्यानंतर सर्वांचा ९ दिवसाचा उपवास सुटतो. हे माझयासाठी लग्नानंतर नवीनच होते, आता हि प्रथा बऱ्याच घरातून असते हे समजले. 


अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे, ज्याला 
महाअष्टमी (Mahaashtami) असेही म्हणतात. या दिवशी माता दुर्गेचे आठवे रूप गौरीची पूजा केली जाते.  गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे. नवरात्रीत महाअष्टमीला इतके महत्त्व का आहे? पौराणिक कथांनुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने  चामुंडा या राक्षसांचा वध केला होता. त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे, त्यामुळे या दिवशी वीर अष्टमी असेही म्हटले जाते. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. या दिवशी निर्जल उपवास केल्यास मुलांचे दीर्घायुष्य वाढते. या दिवशी पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना  गौरीला लाल चुनरीही अर्पण केली जाते.


*वरील माहिती गुगल च्या साहाय्याने घेतली आहे.

Tuesday, October 10, 2023

'खचखोळ' {काही निवडक}-- 2


 

गेली ३/४ वर्षे लिहलेल्या ब्लॉग ची उजळणी करताना मला असे जाणवले की,बऱ्याच ब्लॉग मध्ये कांही कळत नकळ्त बरे विचार मांडले गेले आहेत म्हणून हे निवडक विचार पुन्हा एकदा मांडण्याचे धाडस. 



मन स्वछ असणे हे  काच स्वछ ठेवण्या सारखे.

मनाला स्थिर ठेवणे हे श्वास बंद करण्या येव्हढे कठीण.


रद्दी माणसांची व्याख्या काय? 

करायचीच  झाली तर "गरज सरो वैद्य मरो" हि व्याख्या.


कशा वेळ  फुकट घालवावा
संगीताच्या मैफिलीना
असता कानी स्मार्ट फोन! 
नाही हशा, नाही सम्भाषण 
विसरुनी भाषा मैत्रीची,
अवगतली मूक भाषा    
एकत्र आहोत आम्ही शरीराने!
करावयाची काय दुसरी भाषा
असता कानी स्मार्ट फोन! 

आणखी एक दिवस उजाडला 

हात लिहिताना नाही थरथरला!

हस्ताक्षर उगाचच हसू लागले.


सारे  कसे रम्य पण प्रसन्न,

पापण्यांत साठवून हे तारांगण,

शिरलो मी कुशीत गाढ निद्रेच्या.


नाही. त्याला देश
नाही वेश नाही,
रंग रूप तो ठरवेल तेच
आपली भेटीची वेळ स्वतः तो ठरवितो.
एका लाटेत शेकडो,हजारो, लाखो
 बासरीवाल्या सारखा तो 
एकाच वेळेस घेऊन जातो.






बघता बघता..

बघता बघता... बघता बघता जुलैचे वीस दिवस संपले. दिवस छोटे झाले... रात्र मोठी झाली... पण घड्याळ मात्र अजूनही चोवीस तासच दाखवत आहे. गेल्या दोन-त...