Friday, August 24, 2018

मुंगी


मुंगी साखरेला म्हणाली
“तू एवढी गोड कशी?”
साखर म्हणाली
वडील माझे “ऊस”
माझ्यात उतरलंय
त्यांचे अति गोड रक्त
म्हणून असावी मी ‘गोड’
ते देखील तुम्ही मुंग्या
व माणसे म्हणता म्हणून
मला माझी चव कशी कळणार?
तुम्हा मनुष्याना देखील
कुठे कल्पना असते
आपल्या स्वभावाची?
स्वभावाचे मोजमाप 
आप्तजन ठरवितात,
‘तो वडिलांसारखा एक कल्ली’
‘तीआई सारखी फटकळ’
अशा सोयीस्कर गैरसमजुतीत
गोड मानतात.
आहे की नाही गोड  गम्मत!





1 comment:

  1. अरूण, खरोखरीच तुझ्या कवीतांची विन्दांच्या बालगीतांप्रमाणे तुफानी घोडदौड चालू आहे. मस्तच आहेत.

    ReplyDelete

एक विश्वगीत का नसावे?

  एक विश्वगीत का नसावे? आपण अनेक राष्ट्रांचे नागरिक असलो, तरी एका पृथ्वीची लेकरं आहोत. काही दिवसांपूर्वी फिफा विश्वचषकाचा सामना पाहत बसलो ह...