Tuesday, August 14, 2018

७१ वा स्वातंत्र्य दिन...??


‘भारत’ तेरी उमर कितनी?
७१ साल की
७१ साल मे क्या देखा
क्या सुना, क्या सहा?
बहूत कूछ देखा, सुना, और सहा
पण काय? ... काय?
लोक संख्या ४० कोटी
वरून जवळ जवळ १५० कोटी झाली,
१५ पंतप्रधान पहिले,
काहींनी घोषणा केल्या,
काहींनी बदलीची खुर्ची गरम केली.
एका पंत प्रधानाने चक्क १० वर्षे मौन पाळलेले पहिले.
तुझ्या पाहण्यात  कुठल्या घोषणा यशस्वी झाल्या.
सर्वच,
खर? सांग कुठ्ल्या, कुठल्या
जवाहार जी  ने नारा लागाया, ‘आराम हराम है{.
या नंतर लोक आराम करायला लागले!
जय  जवान जय किसान!
ह्यांचा जय जयकार होण्या आधीच
लाल बहाद्दुर जी चल  बसे;
आगे क्या हुंआ?
इंदिराजी बोली ‘गरिबी हटाव’
उसके बाद सारे ‘गरीब हि हट गये’
भारतीय जनता पार्टी का  ‘इंडिया शायनीग’देखा
मुझे तो कहि  पर ‘शाईन’ नजर नाही आई ,
२०१४ अब की बार आले मोदी सरकार,
त्यांनी नारा दिला
 ‘सब का साथ, सब का विकास’
५ व्रर्षे गेली, विकासाबरोबर
नोटबंदी,जी एस टी,वाढणारी बेरोजगारी सारखे 
त्रासदायक प्रकार पाहिले .नावाजलेल्या उद्योगपतींनी
कोटी कोटीचे आर्थिक घोटाळे करून
देशाची अर्थ व्यवस्था मोडून टाकलेली पाहिली.
पंतप्रधानानी , मारुती प्रमाणे केलेली
पृथ्वी प्रदक्षिणेची उड्डाणे पाहत राहिलो.
या बरोबरच,
आणीबाणी,नसबंदी,स्त्रियांवरील
अत्याचार, सीमेवरील घुसखोरी,काश्मीर प्रश्न,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या,
आरक्षणे,असे भेडसवणारे, इंदिराजी, 
राजीवजी की हत्याअसे 
घृणास्पद प्रकारही पहिले.

जनतेला माझा, 'भारत' देशाचा सवाल
१९४७ ते २०१८ शहरे सुधारली,
खेड्यांचे काय?गरीबी, लोकसंख्या,
जात पात, धर्मवाद, लाच लुचपत,
घराणे शाही,शेतकऱ्यांच्या आत्महत्या असे  अनेक प्रश्नावर
तोडगा काढणारे प्रामाणिक
सरकार कधी येणार ?

हा दरवर्षी  येणारा स्वातंत्र्य दिन 
कशासाठी म्हणून साजरा करायचा?
केवळ एकच नारा यशस्वी झाला
“ इंग्रज भारत छोडो!”म्हणून
कीं
लाऊड स्पीकरवर ‘ मेरे देश की... 
वाजवण्यासाठी?
शहरात फ़्लॅशड़ान्स 
करण्यासाठी?
एक मेकास मोबाईल वर मेसेज करण्यासाठी?
कीं
 केवळ 'भारत माझे जन्म स्थान  आहे ' म्हणून?
कीं...?







1 comment:

तू आहेस!!!!

  तू आहेस !!!! तू आहेस तरी कोण? थोड्यावेळासाठी समजा, मी तुझे अस्तित्व विसरलो, मग हे विश्वास न बसणारे चमत्कार कोण करतो? उत्तराची सुई तुझ्या द...